अमित शहांनी विरोधकांना जनावर संबोधल्यावर राहुल गांधींनी दिल असं उत्तर

भाजपच्या लेखी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हीच दोन माणसं असून बाकी सगळी जनावरं आहेत अशी उपरोधिक टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय.

Updated: Apr 8, 2018, 02:28 PM IST

नवी दिल्ली : भाजपच्या लेखी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हीच दोन माणसं असून बाकी सगळी जनावरं आहेत अशी उपरोधिक टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात अमित शाह यांनी विरोधी पक्षांना साप, मुंगूस, कुत्रे, मांजर असं संबोधून कधीही एकत्र न येणारे प्राणी मोदी विरोधात एकवटत आहेत असं विधान केले होते. शाह यांचं हे विधान विरोधकांचा अपमान करणारं असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलंय.