शेतकरी संघटनांचं हमीभावासाठी दिल्लीत आंदोलन सुरू

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांचं आंदोलन आज दिल्लीत सुरू झालं आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. 

Updated: Nov 20, 2017, 02:44 PM IST
शेतकरी संघटनांचं हमीभावासाठी दिल्लीत आंदोलन सुरू title=

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांचं आंदोलन आज दिल्लीत सुरू झालं आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. 

राजू शेट्टी यांच्या पायी रॅलीला सुरुवात

या आंदोलनात राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह चारशेहून अधिक शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी झालेत.  तर लाखो शेतक-यांची आंदोलनात दिल्लीत आले आहे. सकाळी १० वाजता पहाडगंजमधल्या आंबेडकर भवन येथून राजू शेट्टी यांच्या पायी रॅलीला सुरुवात केलीय. 

रामलीला मैदानातही आंदोलनला सुरुवात

रामलीला मैदानातही आंदोलनला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीच देशभरातून शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते दिल्लीत पोहचलेत. एकीकडे मूडीजने मोदींच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याचे दाखविले असतानाच, दूसरीकडे दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.