पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Updated: Nov 18, 2019, 05:22 PM IST
पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकार बनवण्याबाबत शिवसेना-भाजपला विचारा असं सांगत पवारांनी पुन्हा गुगली टाकली आहे. शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला विचारा अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. शरद पवारांनी दिल्लीत टाकलेल्या या गुगलीमुळे पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित असतील.