हे सरकार भरटकटलेलं आहे - अजित पवार

केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली. 

Updated: Nov 25, 2017, 05:12 PM IST
हे सरकार भरटकटलेलं आहे - अजित पवार title=

सातारा : राष्ट्वादी काँग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाला कराडमधून सुरुवात झाली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नते या आंदोलनात सहभागी झालेत. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली. 

जनता आता दूधखुळी नाही-अजित पवार

यावेळी हे सरकार भरकटलं असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे, जनता आता दूधखुळी नाही, भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर देखील आंदोलन करताना गोळ्या घालत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

समाधीस्थळ ते प्रांत कार्यालय असा मोर्चा

फसलेली कर्जमाफी, वाढत्या नागरिकणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा पुरविण्यात सरकारला आलेलं अपयश, वाढती बेरोजगारी अशा मुद्द्यांवर या आंदोलनात भर देण्यात आला आहे. यावेळी समाधीस्थळ ते प्रांत कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला.