ही फारच मनाला चटका देणारी घटना आहे, कोणत्याच चिमुकल्यांसोबत असं कधीच होवू नये

कोरोनाच्या महामारीमुळे कुटूंबच्या कुंटूंब नष्ट झाली आहेत. कोणाच्या डोक्यावरुन बापाचं छत्रं गेलं तर, कोणी आई विना पोरकं झालं.

Updated: May 1, 2021, 10:40 PM IST
ही फारच मनाला चटका देणारी घटना आहे, कोणत्याच चिमुकल्यांसोबत असं कधीच होवू नये title=

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे कुटूंबच्या कुंटूंब नष्ट झाली आहेत. कोणाच्या डोक्यावरुन बापाचं छत्रं गेलं तर, कोणी आई विना पोरकं झालं. कोणाच्या नवऱ्याची साथ कामची सुटली, तर कधी बायको विना नवऱ्याचा संसार उजाडला. कोरोनाने लोकांना त्यांनी कधी विचार न केलेले दिवस दाखवले.

अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे कोणत्याही मुलाने किंवा पालकांनी विचार न केलेली हळहळून टाकणारी ही घटना घडली आहे. आम्ही थोड्याच दिवसात परत येऊ असे मुलांना सांगून गेलेले पालक घरी परतलेच नाहीत. पालक घरातून निघून गेल्यावर असे काही घडेल असा विचार ना पालकांनी कधी केला असेल ना मुलांनी.

पालकांना कोरोना झाला म्हणून ते उपचारासाठी रुग्णालयात गेले. आम्ही लवकरच परत येऊ असे पालक त्यांच्या दोन मुलांना सांगून गेले. परंतु उपचारा दरम्यान प्रथम त्यांच्या आईचा आणि नंतर त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला आणि मुलांच्या डोक्यावरुन पालकांची सावली गेली.

या जोडप्याचे कुटुंब खूप आनंदी होते. नवरा पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती. पत्नी देखील एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होती. एक मुलगा आणि एक मुलगी असे चार जणांचे एक सुंदर कुटुंब होते. पण कोरोनाने चार दिवसांत हे कुटुंब उध्वस्त केले.

कोरोनाच्या विनाशामुळे कुटुंब विखुरले

ही कहाणी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी ब्लॉकच्या मलकापूर भागातील सीत्तूर गावात राहणाऱ्या पाटील कुटुंबाची आहे. नोकरीच्या संदर्भात महादेव पाटील आपल्या कुटूंबासह पुण्यात शिफ्ट झाले. ते आणि त्यांची पत्नी या जगात राहिले नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांची नऊ वर्षाची मुलगी पूर्वा आणि सहा वर्षाचा मुलगा तन्मय आता पोरके झाले आहेत.

नवरा-बायको कोरोना पॅाझिटिव्ह

आपल्या दोन मुलांना नातेवाईकांकडे सोडून महादेव आणि सीमा पाटील यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सीमा पाटील यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून निराश झालेल्या महादेव पाटील यांचेही दोन दिवसात निधन झाले. त्यानंतर पुर्वा आणि तन्मयच्या डोक्यातून पालकांची सावली कायमची गेली. घराबाहेर पडताना त्यांनी दोघांनाही सांगितले होते की, आम्ही लवकरच परत येऊ, परंतु नंतर ते परत आलेच नाहीत.

नातेवाईकांनी अद्याप मुलांना हे सत्य सांगितले नाही. जेव्हा त्यांना हे सत्य कळेल तेव्हा मुलांना कसे वाटते याबद्दल विचार करून हे सत्य सांगणे नातेवाईकां शक्य होत नाही.