Cold Weather: गरमीने कंटाळलेल्या मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांना थंडीने दिलासा दिलाय. राज्यभरात तापमान खाली आले असून गारठा जाणवू लागलाय. त्यामुळे प्रत्येकाने आपले जपून ठेवलेले स्वेटर, कानटोपी पुन्हा बाहेर काढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील जिल्ह्यांमध्ये कसे आहे तापमान? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरण आल्हाददायक असणार आहे. रात्रीप्रमाणे दुपारीदेखील वातावरणात गारवा दिसून येतो. मुंबईसह कोकणातील किमान तापमान 14 तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस राहिल असा अंदाज हवामान खात्याने नोंदवलाय.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 तर दुपारचे कमाल तापमान 26 अंश राहील. पुढचे 2 दिवस म्हणजेच 23 जानेवारीपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक थंडीचा आनंद लुटत आहेत. मुंबईतील तापमान 16.1 अंश सेल्सिअस आहे. तर तुम्ही सुट्टीमध्ये माथेरानला जायचा विचार करत असाल तर तेथील तापमानही जाणून घ्या. माथेरानचे सध्याचे तापमान 14.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.
अहमदनगर-12.4
अलिबाग-15.2
छत्रपती संभाजी नगर-12.8
डहाणू -16.5
जळगाव-11.3
कोल्हापूर -16.1
महाबळेश्वर -12.5
मालेगाव-13.6
माथेरान-14.2
मुंबई -16.9
नांदेड -17
नाशिक12.01
धाराशिव 17.2
पालघर-18.6
परभणी -15.8
रत्नागिरी -18.2
सांगली -15.4
सातारा-11.9
सोलापूर-15.2
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
GT
(20 ov) 210/4
|
VS |
DC
209/8(20 ov)
|
| Gujarat Titans beat Delhi Capitals by 1 run | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 163/7
|
VS |
SCO
151/9(20 ov)
|
| Oman beat Scotland by 12 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.