सातारा सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी प्रसन्न! कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच धरणातून सातारा सांगली जिह्ल्याला पाणी पुरवठा केला जातो. 

वनिता कांबळे | Updated: Aug 31, 2024, 07:41 PM IST
सातारा सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी प्रसन्न! कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले title=

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हयात असलेले कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी  म्हणून ओळखले जाते. हे धरण दुष्काळग्रस्त भागाची तहानच भागवत नाही तर राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प  कोयना धरणावरच आहे.सातारा सांगली जिल्ह्यावंर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी प्रसन्न झाली आहे. कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाचे जलपूजन केले आहे.  

कोयना धरणात शंभर टीएमसी पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयाचे पूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हस्ते करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. सांगलीतील दुष्काळग्रस्त भागात याच धराणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 

कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. याच नदीवर उभारण्यात आलेले  कोयना धरण देखील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बनले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आले. कोयना धरण 103 मीटर उंच आहे. 1954 साली महाराष्ट्र सरकारने कोयना धरणाचे काम सुरु केले. 1963 धर बांधून पूर्ण झाले. 103 मीटर उंच  हे धरण 803 मीटर  लांब आहे.  कोयना धरणामुळे तब्बल 12 हजार 100 हेक्टर क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे. त्यामूळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. 105 टीएमसी म्हणजेच 2900 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता कोयना धरणाची आहे. 

महाराष्ट्राची प्रगती

कोयना धरणामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात झाली. पश्चिम महाराष्ट्रात भरभराट आली. कोयना धरणामुळे शेतीबरोबरच सातारा सांगली व कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्राला  पाणीपुरवठा होऊ लागला. कोयना धरण हे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावॅट इतक्या प्रचंड क्षमतेची वीज निर्मीती केली जाते. कोयान वीज निर्मिती प्रकल्पातील वीज महाराष्ट्र बरोबरच गोवा व कर्नाटक इतर राज्यांनाही वितरित केली जाते. 

पर्यटनाला चालना 

कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्र विशेषत: सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळाली आहे. धरणातून तयार झालेल्या शिवसागर जलाशयाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. तसेच कोयना अभयारण्य देखील पर्यटकांचे मुख्य आक्रषण आहे.