मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Nov 25, 2024, 05:48 PM IST
मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावमधून निवडणूक जिंकली आणि आठव्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. पण त्यांचा हा विजय काठावर झाला होता. मात्र आज अचानक ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान भेटीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी यामागील कारण सांगितलं. 

Add Zee News as a Preferred Source

शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आज शरद पवार साहेबांशी भेट झाली. यशवंत चव्हाण प्रतिष्ठानची बैठक होती, त्यात सदस्य म्हणून आम्ही उपस्थित होतो. त्यांच्यासोबत राजकीय काहीही चर्चा झाली नाही. प्रतिष्ठानच्या संदर्भात चर्चा झाली नाही. काय घडलं याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वत:च्या निवडणुकीबद्दल काही चर्चा झाली नाही", अशी माहिती त्यांनी दिली. 

"ते नेमकं काय बोलले हे मी सांगणं उचित नाही. ही वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं मत त्यांनी मांडलं. मी त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला," असंही त्यांनी सांगितलं. पार्थ पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत शरद पवारांचे काही आमदार पक्षात प्रवेश करण्यासंबंधी सूचक विधान केलं आहे. त्यावर ते म्हणाले की, "माझ्याशी तरी या बाबतीत कोणाचं बोलणं झालेलं नाही. कोण कोणाशी बोललं आहे, येणार की नाही याबद्दल आता बोलणं उचित नाही. तशी कुठे चर्चा झाली असेल असं वाटत नाही". 

"निवडणूक मॅच फिक्सिंग करुन होत नाहीत. सरळ निवडणूक झाल्या आहेत. ज्यांचा उमेदवार विजयी झाली तोच विधानसभेत येणार," असं सांगत त्यांनी विरोधकांचे दावे फेटाळले. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "अजून तशी चर्चा नाही,. असा विचार समोर आलेला नाही. अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या बाकी आहेत. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ निवडायचं आहे. विधानसभा हिवाळी अधिवेशन झालं पाहिजे. कोणी चर्चा केली तर तो तेव्हाचा विषय आहे. कोण मुख्यमंत्री होणार हे आता युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील".

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More