Mahayuti Oath Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीचा सस्पेन्स चंद्रशेखर बावनकुळेंनी संपवला. 5 डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी होणार असल्याचं बावनकुळेंनी जाहीर केलं. शपथविधी कधी होणार याचं उत्तर बावनकुळेंनी दिलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.
भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा असेल असं राष्ट्रवादीनं आधीच जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला. त्यानंतर दिल्लीत महायुतीची मोठी खलबतं झाली. आता अखेर भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव फिक्स असल्याची चर्चा आहे. भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवलाय. यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री ठरवता न येणं आणि निकालानंतर आठवडाभराहून अधिक काळ सरकार स्थापन करता न येणं, हा महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाचा अपमान आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केलीय.
मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मात्र आमचं सर्व काही ठरलेलं आहे. त्यावर आमच्या बॉसचा शिक्का बसला की सगळं काही समजेल, असं स्पष्टीकरण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलंय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालंय. एकट्या भाजपनं 132 जागा मिळवत महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. मात्र भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही. त्यावरूनही विरोधकांनी हल्लाबोल केलाय. आता महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शपथविधीचा 5 डिसेंबरचा मुहूर्त ठरलाय मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, हे गुलदस्त्यातच आहे.
26 तारखेला विधानसभेची मुदत संपलेली आहे. नवीन विधानसभा, नवीन सरकार अस्तित्वात येणे हे घटनेनुसार आवश्यक होतं. त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील. आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती लागवड लावली असती, असे ते म्हणाले. अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून 10 दिवस होऊन गेले. एवढ बहुमत आहे तर सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुख्यमंत्री कोण? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष इतका मोठा नेते इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(18.4 ov) 125
|
VS |
AUS
126/6(13.2 ov)
|
| Australia beat India by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.