'स्क्रीप्ट रेडी आहे, चित्रपटाचे नाव 'नमक हराम 2'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात संजय राऊतांचा हल्लाबोल

Shivsena UBT Melava : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा (Shivsena UBT) आज ठाण्यात मेळावा झाला. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.

राजीव कासले | Updated: Aug 10, 2024, 09:35 PM IST
'स्क्रीप्ट रेडी आहे, चित्रपटाचे नाव 'नमक हराम 2'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात संजय राऊतांचा हल्लाबोल title=

Shivsena UBT Melava : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा (Shivsena UBT) आज ठाण्यात मेळावा झाला. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाणे हे शिवसेनेचं आहे, पण चोरलेल्या शिवसेनेचं नाही, जी शिवसेना हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, आणि ज्या ठाण्याने हिंदूह्दयसम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला. त्या शिवसेनेचं हे ठाणे आहे. त्या ठाण्याने आत शिवसेना पक्षप्रमुखांचं जोरदार स्वागत केलं आहे अशी सुरुवात संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांचा हल्लाबोल
हा भगवा सप्ताह आहे, पण ठाण्यात काल भगवा सप्ताह व्हायला होता, कारण काल नागपंचमी होती, ठाण्यात ज्या सापाला आपण इतकी वर्ष दूध पाजलं, त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या आता विधानसभेत या सापांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.

शिवसेनाचा भगवा सप्ताह आहे, तर त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींकडे आणि आम्हाला जगवा साहेब अशी विनंती करतात. सध्या ठाण्यातील लोकं खूप सिनेमा काढातायत, मलाही एक सिनेमा काढायाचय त्याचं नाव असणार आहे 'नमक हराम-2'. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. मी चांगला लेखक आहे. लवकरच नमकहाम-2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातली सर्व हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे, ठाण्याचं नाव गद्दारांनी आणि गब्बरांनी मातीत मिळवलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

या ठाण्यात अनेक महान लोकं होऊन गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हे ठाणं, कडवट निष्ठावाण धर्मवारी आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं, ते या गद्दारांनी, नमक हरामांनी ठाण्याचं नाव देशात बदमान केलं आहे. जिंकण्यासाठी दररोज नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. मिंदे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाही, कारण त्यांच्या रक्त्तातच लबाडी आहे, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केलीय.

लाडकी बहिण घोषणा केली आहे. नंतर काय तर लाडकी खुर्ची, मोदींचे लाडके गद्दार. ठाण्यात किती लाडकी बहिणींचे संसार उद्ध्वस्त केले. ते आधी सांगा. लहान लहान व्यवसायांवर बुलडोझर फिरवण्यात आले. या लाडक्या बहिणी नव्हत्या का. लाडक्या बहिणींची किंमत फक्त 1500 रुपये आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. हा गुजरात पॅटर्न आहे, हा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, सर्व लुटून न्यायचं आणि या मिंद्यांनी गप्प बसून पाहात राहायचं. हे होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही तुमची कबर खोदायला गेलो होतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. दिल्ली आम्हाला शिकवू नका, तुमच्या पोरा-बाळांना लायकी नसताना दिल्लीत पाठवण्याचं काम केलंय. देशात हुकूमशाहीचं संकट आहे म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीत जात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.