व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना वाहनाने चिरडले

महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले.

Updated: Jul 20, 2019, 11:59 AM IST
व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना वाहनाने चिरडले  title=

बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गडी माजलगाव महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी तळेवाडी शिवारात घडली. या अपघातात तिघांचा ही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

कार - ट्रकच्या भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार 

महामार्गाच्या कडेला व्यायाम करत भरधान वाहनाने धडक दिली. यात तीन शालेय विद्यार्थी ठार झालेत. गेवराई तालुक्यातील गढी जवळ ही घटना घडली. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत. सुनील प्रकाश थोटे (१४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) आणि अभिषेक भगवान जाधव (१४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

हे तिघे कल्याण -विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात वाहनाने तिघांना पाठीमागून जोरदार धडक देत चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.