Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात चार ते पाच दिवसात नवीन सरकार येणार

महाराष्ट्रसह दिल्लीत हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

Updated: Jun 23, 2022, 06:34 PM IST
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात चार ते पाच दिवसात नवीन सरकार येणार title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात नवीन सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नवीन सरकारमध्ये भाजप सहभागी असेल अशी माहितीही समोर आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेंच गणित
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असं सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्यात.

आणखी आणदार फोडण्याची रणनिती
शिवसेनेचे आणखी आमदार आणि खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवी रणनीती आखलीये. त्यासाठी एकनाथ शिंदेंनी 5 आमदारांचा एक गट तयार केलाय. हा गट शिवसेना आमदार आणि खासदारांशी सतत संपर्क साधतोय. जे आमदार, खासदार गळाला लागतात त्यांना थेट गुवाहाटीला बोलावण्यात येतंय. केवळ आमदार खासदारच नव्हे तर आता एकनाथ शिंदेंनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही संपर्क सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पदाधिकारीही सोबत आल्यास शिवसेनंचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही ताब्यात येईल अशी शिंदेंची रणनीती आहे..

शिंदे गटाला उपमख्यमंत्रीपदाची ऑफर
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदार, खासदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. 

उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.