अशी हिम्मत होतेच कशी, मुजोर फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे - राज ठाकरे

Feriwala Issue - Raj Thackeray's warning : ठाण्यात अवैध फेरीवाल्यांची मुजोरीविरोधात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. 

Updated: Aug 31, 2021, 12:37 PM IST
अशी हिम्मत होतेच कशी, मुजोर फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे - राज ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई :  Feriwala Issue - Raj Thackeray's warning : ठाण्यात अवैध फेरीवाल्यांची मुजोरीविरोधात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. (Thane Feriwala Issue ) साहाय्यक महापालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तीन बोटं छाटली गेली आहेत. आरोपी पोलिसांकडून सुटला तर मनसेकडून मार खाईल, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे.

फेरीवाला सुटल्यानंतर आधी पोलिसांचा मार खाईल, त्यानंतर मनसेकडून त्याला इंगा दाखवला जाईल. आता अटक केली. त्यानंतर त्यांना जामीन मिळेल आणि ते बाहेर येतील. यांना ठेचले पाहिजे. अधिकाऱ्याची बोट छाटली, याआधी अशी कोणाची हिम्मत झालेली नाही. भीती काय असेल तर ते जेलमधून बाहेर येतील, त्यावेळी त्यांना समजेल. भीती काय असते ती, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. यांची जेव्हा बोट छाटली जातील आणि त्याला जेवता येणार नाही, त्यावेळी त्याला समजेल, असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी दिला आहे.

ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठली. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. हल्लेखोर फेरीवाला अमरजीत यादव याच्या या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटं छाटली गेली आहेत.