विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी

मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.

Updated: Aug 11, 2017, 04:07 PM IST
विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी title=

मुंबई : मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.
 
विरोधकांची विधानसभेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

- आरोप 

- सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत आहे
- मुख्यमंत्री म्हणाले होते चौकशी समिती नेमू
- मात्र अद्याप त्याबाबत कार्यवाही नाही
 

- जयंत पाटील

- कागदपत्री पुरावे आहेत मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत
- नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात
 - ना खाऊंगा न खाने दुंगा, जो खाया है वो निकालूंगा
- मग आम्ही भ्रष्टाचाराची जी प्रकरणी बाहेर काढली आहेत, कागदोपत्री पुरावे दिले आहेत
- मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा
- गोल गोल उत्तर देऊ नये

विखे-पाटील

- मुख्यमंत्री म्हणाले होते प्रकाश मेहतांबाबत विरोधी पक्षनेत्यांशी बोलून चौकशी समिती नेमणार
- काय झाले त्याचे, कधी नेमणार चौकशी समिती
- भ्रष्ट मंत्र्यांना सरकार पाठिशी घालतेय
- सभागृहात जाहीर करूनही चौकशी समिती नेमत नाही