१९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणी ३ नराधम आरोपींना अटक करण्यात आलीय. औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात ही घटना घडलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 24, 2013, 06:52 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणी ३ नराधम आरोपींना अटक करण्यात आलीय. औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात ही घटना घडलीय.
मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान तीन युवक रिक्षात आले आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला निर्जन स्थळी नेऊन बलात्कार करण्यात केला.
१९ वर्षाच्या विवाहितेवर सातत्याने दोन दिवस बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या तरूणीचा विवाह काही महिन्यांपूर्वी ‌मसनतपूर येथील युवकासोबत झाला होता. तिचा पती नांदेड येथे रेल्वे विभागात कार्यरत आहे. गेल्या एक महिन्यापासून ही युवती संजयनगर येथे तिच्या माहेरी आली होती.

मंगळवार, २३ एप्रिल सायंकाळी साडेसात वाजता ही युवती सासरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी तेथे तीन युवक रिक्षा घेऊन आले. यावेळी तिच्या परिचयाचा मनोज रामराव जाधव हा युवक रिक्षा चालवत होता. तर संघर्ष भाऊसाहेब लांडगे आणि सागर बबन दळवी (सर्व रा. संजयनगर परिसर) हे दोघे मागे बसले होते. मसनतपूर येथे सोडतो असे सांगत या युवकांनी तिला रिक्षात बसवले.
रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने मार्ग बदलल्यानंतर युवतीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे तोंड दाबून तिला मारहाण आरोपींनी केली. जवळच असलेल्या एका हायस्कूलजवळील मोकळ्या मैदानात या आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.