`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ

अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 30, 2014, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.
नुकतीच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर रणबीर कपूर-कतरीना कैफ २०१५मध्ये लग्न करणार असल्याची बातमी होती. याबबतच कतरीनाला विचारलं असता, असं काही असेल तेव्हा मीच सांगेन, असं कतरीना म्हणाली.
सुपरस्टार सलमान खानसोबत डेटिंग केल्यानंतर कतरीना खूपच सावध झालीय. ती आता आवर्जून आपल्या पर्सनल लाईफवर बोलणं टाळते. ती म्हणाली, आता कोणतीही अफवा मला त्रास देत नाही. मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्षच देत नाही.
रणबीर-कतरीनाच्या लग्नाची चर्चा सामान्यांमध्येच नाही तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरू आहे. हे दोघंही सध्या `जग्गा जासूस` चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.