झाडीपट्टीचं बॉलिवूड! (लेख)

‘झाडीपट्टीची मुंबई’ म्हणून ओळखलं जातं ते गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज वडसा हे गाव... ऐकून तुम्हाला जरा नवल वाटेल... पण हे खरं आहे... खरोखरच हे मुंबई पेक्षा काही कमी नाही... इथं गेल्यानंतरच तुमचा यावर विश्वास बसेल... मी हे असं का सांगतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... याचं कारण म्हणजे दिवाळी!

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 4, 2013, 04:39 PM IST

.

.
‘झाडीपट्टीची मुंबई’ म्हणून ओळखलं जातं ते गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज वडसा हे गाव... ऐकून तुम्हाला जरा नवल वाटेल... पण हे खरं आहे... खरोखरच हे मुंबई पेक्षा काही कमी नाही... इथं गेल्यानंतरच तुमचा यावर विश्वास बसेल... मी हे असं का सांगतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... याचं कारण म्हणजे दिवाळी!
दिवाळी जशी जवळ येते तसं झाडीपट्टीला वेगळंच तेज येतं. कारण इथं रंगतात झाडीपट्टीची बहारदार नाटकं... हे सगळं असलं तरी महाराष्ट्रातल्या लोककलांमध्ये अजूनही झाडीपट्टीला स्थान मिळालेलं नाही. महाराष्ट्राची लावणीच सगळ्यांना माहितीय, पण त्या व्यतिरिक्तही अनेक लोककला आहेत. त्यामुळंच विदर्भातल्या या प्राचीन कलेची.. झाडीपट्टी, तिथली नाटकं आणि ‘दंडार’ या लोककलेची माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न...

राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. या दिवाळीनिमित्तच विविध कार्यक्रम आणि लोककलाही सादर केल्या जातात. कोकणात जसं दशावताराचं महत्त्व आहे तसंच विदर्भात आहे झाडीपट्टी रंगभूमीचं...
सुरूवातीला झाडीपट्टी म्हणजे काय हे जाणून घेऊया...
झाडीपट्टी... वर्धा नदीमुळं विदर्भाचे दोन भाग होतात. एक पश्चिम विदर्भ आणि दुसरा पूर्व विदर्भ... पश्चिम विदर्भाला म्हणतात वऱ्हाड तर पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टी... झाडीपट्टीत पूर्व विदर्भातल्या भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या झाडीपट्टीचा उल्लेख आपल्याला पुराण काळापासून आलेला दिसतो. ‘लीळा चरित्रा’तही झाडीपट्टीचा उल्लेख आहे.
झाडीपट्टीचं नाटक आणि दंडार
“आली दसरा, दिवारी, किती रोज?
केला डंडारीचा साज
माज्या गावून डंडारी गेल्या बहू
जानार माजा भाऊ”
दसरा, दिवाळी येतेय, मंडई लागेल, दंडार ( हाती दंड म्हणजेच काठी घेऊन केलं जाणारं नृत्य म्हणजे ‘दंडार’) असेल... माझा भाऊ तिथं येईल, असे भाव एक बहिण या गीतातून व्यक्त करतेय. या गीतातूनच आपल्याला दंडार आणि नाटकांचं झाडीपट्टीतलं महत्त्व दिसून येईल. म्हणूनच इथली प्रत्येक व्यक्ती दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असते...सुगीचे दिवस आले, धान निघालं की इथल्या गावातल्या प्रत्येकाला वेध लागतात ते दंडारचे आणि झाडीपट्टीच्या नाटकांचे... याची सुरुवात होते ती भाऊबीजेच्या दिवसापासून... बहीण आपल्या भावाला ओवाळायला माहेरी आलेली असते. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण उत्साहात असतात... त्यामुळंच मनोरंजन आणि भेटीगाठीचा हा रम्य सोहळा सुरू होतो... आणि भाऊबीजेपासून तो पुढचे दोन महिने असाच अविरत सुरू असतो. या गावावरुन त्या गावी... विविध विषय, विविध कल्पना, नृत्य, गायनाची मेजवानीच प्रेक्षकांना मिळते.
मात्र यासाठी तयारी ही दिवाळीआधीपासूनच सुरू होते. प्रत्येक गावातल्या पाटलाच्या वाड्यात दंडारसाठी लागणारं सगळं साहित्य ठेवलेलं असतं. त्यात पडदे, कलाकारांचे कपडे, दागिने इत्यादी वस्तू असतात. शिवाय स्टेजसाठी लागणारं लाकूडही असतं. ते आणून स्टेजची तयारी केली जाते आणि पडदे, वाद्य साहित्य धुवून वाळवलं जातं.
तर झाडीपट्टीची नाटकं ही एखादा निर्मात्याचं प्रॉडक्शन हाऊस जसा चित्रपट बनवतो. त्यापद्धतीनंच तयारी केली जाते. त्यात नाटकाचा डायरेक्टर, कलाकार, डान्सर या सर्वांचाच समावेश असतो. नाट्य कलाकारांची प्रत्येक टीम आपल्या विषयासह सज्ज असते.
दिवस भाऊबीजेचा
भाऊबीजेचा दिवस उजाडतो आणि मंडईला सुरुवात होते. मंडई म्हणजे एक प्रकारची जत्राच जिथं दंडार सादर करणारी वेगवेगळी मंडळं येतात आणि नाटकासाठीची सुपारी घेतात. कोणत्या गावात कधी मंडई होणार हे पूर्वापर ठरलेलं आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. तरीही दरवर्षी लोक तिथं हजर असतात. गावांमध्ये भरणाऱ्या या मंडईला लहानग्यांसाठी तर धमाल असते. वेगवेगळी खेळणी, खाऊ घ्यायला मुलं सरसावली असतात.
या मंडईत ठरतात त्या नाटकांच्या आणि दंडारच्या तारखा आणि गाव... कोणत्या गावी, कोणतं नाटक सादर केलं जाईल, त्यासाठी नाटक सादर करणाऱ्या ग्रुपला म्हणजेच निर्मात्याला किती पैसे मिळतील, हे ठरवलं जातं. नाटकाचा विषय आणि नाटकात असलेल्या कलाकारांवरून त्याचे दर ठरतात. एकदा नाटकाचा टाईमटेबल ठरला की मग सुरू होतो धमाल प्रवास आणि मनोरंजन...या सर्वातच भाऊबीजेची संध्याकाळ उजाडते आणि नाटकांच्या तय