वेस्टर्न रेल्वेला लोकल वाढणार का?

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे.

Updated: Mar 12, 2012, 09:48 PM IST

www.24taas.com, अमित जोशी, मुंबई.

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. तेव्हा गर्दीच्या वेळी दोन लोकल गाड्यांमधील वेळ ही तीन मिनीटांपेक्षा कमी करणे शक्य होणार आहे.

 

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याबरोबरच लोकलची संख्या वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केलीये.

 

पश्चिम रेल्वेमधील विरार- डहाणू लोकल तत्काळ सुरु करावी, तसचं डहाणू-विरार शटल सेवा वाद्रयापर्यंत सुरु करावी, विरारपर्यंतच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवावी, त्य़ाचप्रमाणे हार्बर रेल्वेची गोरेगावपर्यंत विस्तार करावा, अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या आहेत.

 

 जीवघेणी गर्दी अशी पश्चिम रेल्वेच्या या उपनगरीय मार्गाची ओळख आहे. एकुण 1214 लोकलच्या फे-या तब्बल 30 लाख प्रवाशांची दररोज ने-आण करतात. गर्दीच्या वेळी तीन मिनिटाला लोकल धावत असते. तेव्हा लोकलचा वेग वाढल्यास तीन मिनीटांचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.

 

पश्चिम रेल्वेमधील विरार- डहाणू लोकल तत्काळ सुरु करावी, तसचं डहाणू-विरार शटल सेवा वांद्रयापर्यंत सुरु करावी, विरारपर्यंतच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवावी, अशी रेल्वे प्रवाशांची  मागणी आहे.

 

हार्बर रेल्वेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याची मागणी.

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे जास्त अंतराच्या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तर लोकल , 100 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केलीये. लोकलचा वेग वाढवल्यास जादा गाड्या सुरु करणे शक्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.