गणेशोत्सवाची परंपरा

गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 12, 2012, 10:46 AM IST

www.24taas.com,मुंबई
गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
३११ वर्षांची परंपरा असलेला महागणपती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे महागणपतीची स्थापना सन १७०१ मध्ये या घराण्याचा मूळपुरुष शिव तांडेल याने सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच त्या घराण्याच्या पहिल्या पिढीपासून अगदी आतापर्यंतची नववी व दहावी पिढी त्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत आहे. ‘लिम्का बुक’नेही मान्यता दिलेला भारतातील पहिला आणि ३११ वर्षांची परंपरा असलेला हा आगळावेगळा महागणपती आहे.
या महागणपतीची मूर्ती बनविण्यास श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात. गणेश चतुर्थीला या महागणपतीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा होते. दुसर्याल दिवशी उंदीर पूजेला ठेवतात. तिसर्याळ दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरू होते व ते पाचव्या दिवशी संपूर्ण रंगवून संपते. शेवटचे रंगकाम विसाव्या दिवशी दुपारी होते. पहिले चार दिवस सफेद, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा २१ दिवसांत वेगवेगळा दिसणारा असा हा जगातील एकमेव गणपती आहे.

गणेश गल्लीचा राजा
मुंबईतल्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला जगभरातून लोक येत असतात. या राजाच्या सेवेला जवळजवळ तीन हजार कार्यकर्ते कार्यरत असतात. ‘लालबागचा राजा’नंतर मुंबईतल्या लोकांची पावलं आपोआप वळतात ती गणेश गल्लीच्या राजाकडे. पण या राजाचं मंडळ हे त्या बाप्पाच्या सेवेसोबतच समाजाप्रती असलेलं ऋृण फेडण्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात. या मंडळातर्फे दरवर्षी लोकांसाठी आरोग्य शिबीर, चष्मे वाटप, मोतिबिंदू ऑपरेशन मोफतरीत्या केलं, राबवलं जातं.
जीएसबीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंग सर्कलच्या राजाची मूर्ती ही दरवर्षी शाडूच्या मातीची तयार केलेली असते. तसंच ही मूर्ती नागपंचमीच्या दिवशी बनवायला सुरुवात केली जाते. या गणपतीवर दरवर्षी ६८ किलो सोनं व चारशे किलो चांदी चढवली जाते.
लालबागचा राजा
लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री`ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा` म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.
गिरगावचा गणेशोत्सव
गिरगावनेही आता टॉवर्सची उंची गाठण्यास सुरुवात केली असली, तरी आजही बहुतांश पारपंरिक पद्धतीचा आणि कार्यकर्त्यांचा उत्सव हे गिरगावच्या गणेशोत्सवाचे रूप कायम टिकून आहे. व्यापारीकरणाची लागण येथेही झाली आहे, पण खूपच कमी प्रमाणात. गिरगावचा गणेशोत्सव म्हटला की प्रामुख्याने तीन भाग येथे पडतात. गिरगावच्या सुरुवातीचा चिराबाजारचा भाग , त्यानंतर झावबावाडी , ठाकूरद्वारपासून सुरू झालेला थेट मुगभाट , आंबेवाडी , रामचंद्र बिल्डिंग , प्रार्थना समाजपर्यंतचा परिसर आणि त्यापलीकडचा खेतवाडीचा परिसर.
गणेशोत्सवाच्या दरम्यान अख्खे गिरगाव एक मंडपच बनल्यासारखे. इथे सार्वजनिक गणेशोत्सवांची जितकी मोठी संख्या तितकीच घरगुती गणपतींची संख्याही मोठी असते. त्यामुळेच तर विसर्जनाच्या मिरवणुकींप्रमाणे गणेशचतुर्थीच्या म्हणजेच पहिल्या दिवशी वाजतगाजत प्रत्येक जण आपापली मूर्ती घरी आणतात. पूर्वापारचे मराठी - गुजराती - गिरगावलाच खेटून असलेल्या खेतवाडीचा तोंडवळा मात्र पूर्वापार वेगळाच असतो. खेतवाडीच्या पाचव्या सहाव्या गल्लीपासून अकराव्या - बाराव्या गल्लीपर्यंत