देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे, देशात भाजपचे सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला.

Updated: Jul 6, 2016, 05:49 PM IST
देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे, देशात भाजपचे सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला.

'देशात भाजपचे सरकार आल्यामुळे गेली दोन वर्षे दुष्काळ पडत आहे. परंतु, बिहारमध्ये आमचे सरकार आल्यामुळे आकाशातून मोठ्या प्रमाणात अमृत पडत आहे. सगळे कर्माचे फळ आहे.' असं यादव यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे.

यादव आणखी पुढे म्हणाले,  'जगा आणि जगू द्या, हे आमचे धोरण आहे. परंतु, रिलायन्सचे म्हणणे आहे की, एकाला जगू द्या, बाकीचे मरूद्या. केंद्रातील कॉल ड्रॉप मंत्री तर ड्रॉपच झाले आहेत.'