शांघाय सारखी चमकणार आमची मुंबई!

 चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौऱ्यावर असून आज भारत आणि चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केलं. 

Updated: Sep 18, 2014, 06:24 PM IST
शांघाय सारखी चमकणार आमची मुंबई! title=

नवी दिल्ली:  चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौऱ्यावर असून आज भारत आणि चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केलं. 

यात मोदी म्हणाले, आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा अशा विविध विषयांवर आम्ही गेल्या दोन दिवसांत चर्चा केली. नागरी अणू करारावरही दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चेचा सुरुवात होईल. सीमा प्रश्नावरही चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली असून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, असं मोदींनी सांगितलं. चीनमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात भारतीय कंपन्यांवर घातलेले निर्बंधही मागे घ्यावे, अशी मागणीही जिनपिंग यांच्याकडे केल्याचं मोदींनी नमूद केलं.

 

मोदींनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

 

  • भारत-चीन दरम्यान 12 सामंजस्य करार

  • सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याबाबत करार

  • मुंबईचं शांघाय करण्याबाबत करार

  • दोन्ही देशांमधला व्यापार समतोल राखला पाहिजे- मोदी

  • भारतातील रेल्वे विकासासाठी चीन मदत करणार

  • भारत-चीन मैत्री जगाला दिशा दाखवू शकेल

  • कैलास मानससरोवर यात्रेसाठी दुसरा रस्ता खुला करणार

  • भारत-चीन सीमाक्षेत्रावरील वादावर लवकर तोडगा काढला पाहिजे

तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीन इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली आहे. आगामी पाच वर्षात चीन भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल असंही जिनपिंग यांनी जाहीर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.