कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक

 मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. 

Updated: Nov 11, 2016, 10:31 PM IST
कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक  title=

कानपूर :  मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. 

झी मीडियाचे आवाहन अफवांवर विश्वास ठेऊ नका...

अनेकांनी दुकानाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. त्यात मीठ सर्वप्रथम पाहिजे यावरून वाद झाला आणि  कानपूरमधील  बाजारपेठेत दगडफेक झाली. त्यामुळे घबराट निर्माण झाली. 

देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मीठाचा मोठा तूटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने लोकं महाग मीठ खरेदी करु लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये अशी अफवा पसरली की १५ ते १६ रुपयाला मिळणार मीठ २०० ते ४०० रुपयाला विकलं जाऊ लागलं.

लखनऊ, बरेली, दिल्ली, नोएडा आणि देशातील अनेक भागांमध्ये एका अफवेमुळे मीठ खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक जण तर मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करतांना दिसून आले. नोट बदलण्याची रांग सोडून लोकं आता मीठ खरेदी करण्यासाठी रांगा लावू लागले आहेत. मीठाची मागणी अचानक वाढल्याने किंमती ही वाढू लागल्या आहेत.

सरकारने स्‍पष्‍ट केलं आहे की ही फक्त एक अफवा आहे. यामध्ये काहीही सत्य नाही. मीठाची कोणतीही कमकरता झालेली नाही. त्यामुळे जनतेला देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा अफवा आणि आणखी काही अफवा देशात पसरतील त्यावर विश्वास ठेऊ नका.