अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

Updated: Oct 26, 2016, 05:38 PM IST
अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार! title=

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

यासाठी, आज अक्षय कुमारनं राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबीयांना आणि या भागाला मदत करण्याची इच्छा यावेळी अक्षयनं व्यक्त केली. 

याविषयी चर्चा झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात ज्या गावात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या गावाला अक्षय कुमार घेणार दत्तक घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची अक्षयची ही काही पहिलीच वेळ नाही... याआधीही वेळोवेळी मदत जाहीर करून त्यानं आपल्या मनाचा मोठेपणा आणि संवेदनशीलता दाखवून दिलीय.