चार दिवसात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार- घोरपडे

पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार असून, पडलेलं भगदाड कशानं बुजवायचं असा प्रश्न पक्षाला पडेल? माजी मंत्री अजितराव घोरपडेंनी असा दावा केलाय. 

Updated: Jul 14, 2014, 10:54 AM IST
चार दिवसात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार- घोरपडे title=

सांगली/ औरंगाबाद: पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार असून, पडलेलं भगदाड कशानं बुजवायचं असा प्रश्न पक्षाला पडेल? माजी मंत्री अजितराव घोरपडेंनी असा दावा केलाय. 

सांगली जिल्ह्यातल्या सावळज इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं अवास्तव विश्वास ठेवून एकच नेते वाढवले, त्यामुळं खासदारांची संख्या चारवर आली, अशी टीकाही घोरपडेंनी केलीय. 

तर दुसरीकडे औरंगाबादेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा आहे. अनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पक्षाचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणारेत. 

निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा महत्वाचा मानला जातोय. पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकणे आणि जोमानं कामाला लागावेत हा या मेळाव्याचा उद्देश आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.