कोकणात पाचव्या दिवशाही मुसळधार

रत्नागिरीत सलग पाचव्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.

Updated: Jul 14, 2014, 12:14 AM IST
कोकणात पाचव्या दिवशाही मुसळधार title=

रत्नागिरी : रत्नागिरीत सलग पाचव्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.

दिवसभर कोसळणारा पाऊस भात लावणीसाठी पोषक ठरत असून शेतकरीराजाने लावणी तीव्रगतीने उरकण्यावर भर दिला आहे.

या पावसाचा फटकाही काही भागांना बसला असून महामार्गावर काही ठिकाणी दरड कोसळणे, घराचे नुकसानीच्या घटनाही घडल्यात.

वादळी वा-यासह सतत कोसळणा-या पावसानं समुद्रकिनारपट्टीवरच्या गावांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.