मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे

राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 27, 2017, 09:19 PM IST
मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे  title=

पुणे : राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.

केंद्र सरकार तूर डाळ घेत नाही.सर्व स्थरावर हे सरकार अपयशी ठरले आहेत.काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने काढलेल्या संघर्षयात्रा काढली ती भाजपसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे भाजप संघर्षयात्रेवर टीका करत आहे.

मुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना शेतकरी आत्महत्या करत होते म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सरकार वर ३०२ गुन्हा दाखल करावा असं म्हणत होते.पण आता मुखयमंत्र्यावर ३०२ दाखल करावा का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इतिहासात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या भाजप सरकारच्या काळात आत्महत्या झालाय आहेत.