राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका, शेतीचे मोठे नुकसान

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळणी पाऊस सुरू असतांना परभणीतही वीजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

Updated: Mar 1, 2016, 08:03 AM IST
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका, शेतीचे मोठे नुकसान title=

परभणी : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळणी पाऊस सुरू असतांना परभणीतही वीजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

त्यानंतर रात्री उशिरा पालम, गंगाखेड, पूर्णा आणि मानवत तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस पडला. त्यामुळ आंबा, ज्वारी या पिकांच मोठ्ठं नुकसान झालय. तर हिंगोलीमध्ये रात्री उशिरा जोराचा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील कडोळी गोरेगाव येथे गारा पडून कांदा, गहू, हरबरा आणि टाळका ज्वारीच अतोनात नुकसान झालंय. औंढा नागनाथ तालुक्यातील माथा परिसरातही बराच वेळ गारांचा पाऊस पडला. कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, सोडेगाव, पांघराशिंदे या गावात गरांसाह पाऊस झालाय. वसंत तालुक्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. 

१५ गावांना पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गरपीटीचा जोरदार तडाखा

जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील सुमारे १५ गावांना सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गरपीटीचा जोरदार तडाखा बसला. पारोळा तालुक्यातील कोळपींप्रि, अंबापींप्रि, बहादरपुर, कंकराज, भिलाली, इंद्रापींप्रि, सडावन, रडावन तसेच अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, फाफोरे या गावात गारपीट तर मंगरुळ, शिरुड गावात वादळाचा तडाखा बसला, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहु, हरभरा, कांदा तसच मका पिकांचे मोठे नुकसान झालय.

आधीच दुष्काळ त्यात कसंबसं शेतक-यांनी पीकं जगवली.. भीषण दुष्काळात या पिकांच्या उत्पादनातून दोन पैसे मिळतील अशी बळीराजाची अपेक्षा होती...पण अस्मानी संकटानं शेतक-यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलंय.  गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊन तीन दिवस उलटले पण शासकीय यंत्रणा अजूनही शेतात पोहचली देखील नाही.