पाकिस्तानच्या भूमिकेबाबत मोदींवर ठाकरेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तेही मागच्या सरकारप्रमाणेच पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Updated: Jul 10, 2015, 07:59 PM IST
पाकिस्तानच्या भूमिकेबाबत मोदींवर ठाकरेंची टीका title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तेही मागच्या सरकारप्रमाणेच पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, पुढच्या वर्षी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याचंही भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. पाकिस्तानच्या भूमिकेबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात ५५ मिनिटं झालेल्या चर्चेत दक्षिण आशियातल्या दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली.  रशियातल्या ऊफा शहरात आज शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या नेत्यांची शिखर परिषद होतेय. या संघटनेत भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आलाय. 

मोदींच्या शपथविधीला शरीफ यांची उपस्थिती, आणि त्यानंतर मोदी-शरीफ यांच्यात प्रस्थापित झालेला सलोखा वर्षभरापूर्वी बराच चर्चेत आला. पहिल्या भेटीतच भारत-पाक संबंध सुधारण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला होता. पण पाकनं काश्मीरमधल्या फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांशी स्वतंत्र बातचीत करण्याचा घाट घातला. त्यावर भारतानं तीव्र निषेध व्यक्त करून पाकशी होणाऱ्या सगळ्या चर्चा थांबवल्या. त्यानंतर आज झालेल्या चर्चेनं दोन्ही देशातले संबंध सुधाराण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.