मुंबईत आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात

मुंबईत उद्यापासून आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. 

Updated: Aug 21, 2016, 03:43 PM IST
मुंबईत आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात  title=

मुंबई : मुंबईत उद्यापासून आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. 

गुंदवली ते कापूरबावडी बोगद्याचं काम हाती घेण्यात आल्याने सोमवारपासून 20 टक्के पाणीकपात असेल. 

22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत हे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. या पाणीकपातीची झळ दहीसर, कुलाबा या परिसरांना तसंच डोंगराळ परिसरात राहणा-या प्रवाशांना बसेल.