एकता कपूरच्या तीन मालिका धोक्यात

मुंबईत आयकर विभागाच्या धाडींमुळे बालाजी टेलिफिल्म्सच्या ३ मालिका धोक्यात आल्यात. त्यामुळे एकता कपूरपुढे पेच निर्माण झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 1, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईत आयकर विभागाच्या धाडींमुळे बालाजी टेलिफिल्म्सच्या ३ मालिका धोक्यात आल्यात. त्यामुळे एकता कपूरपुढे पेच निर्माण झाला आहे.
महिलांमध्ये लोकप्रिय असलेली बडे अच्छे लगते है, तसंच क्या हुआ तेरा वादा आणि पवित्र रिश्ता या बालाजीच्या सिरियल्स यापुढे बघायला मिळतील का, असा प्रश्न आहे.

बालाजी टेलिफिल्मवर आयकर विभागानं धाड टाकलीये. एकता कपूरच्या जूहू इथल्या घरावर आणि बालाजी टेलिफिल्मच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिका-यांनी धाडी टाकल्यात. एकता कपूर, तुषार कपूर आणि जितेंद्र यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आलेत.
जवळपास १०० अधिका-यांच्या तुकडीकडून ही छापेमारी सुरू आहे. बालाजी टेलिफिल्मने टॅक्स चुकवल्याचा संशय आयकर विभागाला आहे. सिरियल्ससोबतच बालाजी टेलिफिल्म्सचे काही चित्रपटही अर्धवट अवस्थेत आहेत.