भारताने शेवट गोड केला

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला. 

Updated: Jan 23, 2016, 05:20 PM IST
भारताने शेवट गोड केला title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला. मनीष पांडेने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने अखेरच्या सामन्यात अखेर विजय मिळवला. मालिका हातातून गेली असली तरी मात्र हा सामना जिंकत भारताने व्हाईटवॉश टाळला. 

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. डेवि़ड वॉर्नर आणि मिशेल मार्शच्या शतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला तीनशेपार धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने दोन चेंडू आणि सहा गडी राखत विजय मिळवला. या विजयात मनीष पांडेचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याने ८८ चेंडूत महत्त्वपूर्ण नाबाद १०२ धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माचे शतक अवघ्या एक धावेने हुकले. तो ९९वर बाद झाला. सलामीवीर शिखर धवनने ७८ धावांची खेळी केली. मनीष पांडेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड