भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप

भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

Updated: Feb 12, 2017, 04:36 PM IST
भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप title=

बंगळुरु : भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

पाकिस्तानकडून मोहम्मद जामिल आणि बादर मुनीरने पहिल्या विकेटसाठी ५८ रन केले. पाकिस्तानला पहिला झटका जामिलच्या रुपात लागला. भारताकडून मोहम्मद जफर इकबाल आणि केतन पटेलने दोन-दोन विकेट घेतले तर अजय कुमार रेड्डी आणि सुनील आरने एक-एक विकेट घेतला.