आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर

आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत. 

Updated: Apr 13, 2016, 05:52 PM IST
आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर title=

मुंबई : आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे तसे आदेश बीसीसीआयला दिलेत. यासंबंधीच्या याचिकेवरची पुढली सुनावणी २ मे रोजी होणार आहे. 

दरम्यान, आयपीएल महाराष्ट्राबाहेर गेलं तर राज्याचं १०० कोटींचं नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली होती. राज्यानं १०० कोटींचं नुकसान करण्यापेक्षा हे पैसे दुष्काळासाठी वापरावे असा सल्लाही अनुराग ठाकूर यांनी दिला होता.

राज्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे आयपीएलवेळी पाण्याची नासाडी होईल, ती टाळण्यासाठी आयपीएलच्या राज्यात होणाऱ्या मॅच बाहेर घ्याव्या, या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल राज्याबाहेर गेली तरी काही फरक पडणार नाही, आयपीएलसाठी पिण्यायोग्य पाणी देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. 

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आयपीएलच्या १८ मॅच होणार होत्या. यातल्या पहिल्या मॅचला हायकोर्टानं परवानगी दिली आहे. पण पुढच्या मॅचबाबतची टांगती तलवार होती.  आता तर ३० एप्रिलनंतरच्या सर्व सामन्यांना बंदी न्यायालयाने केलेय. त्यामुळे हे सामने आता राज्यात होणार नाहीत.