तरेच्या खेळीने मुंबईला मिळाला विजय

कर्णधार आदित्य तरेने झळकावलेल्या ७१ धावांच्या जोरावर मुंबईने मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत केरळला सहा विकेट राखून हरवले. 

Updated: Jan 16, 2016, 01:29 PM IST
तरेच्या खेळीने मुंबईला मिळाला विजय title=

मुंबई : कर्णधार आदित्य तरेने झळकावलेल्या ७१ धावांच्या जोरावर मुंबईने मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत केरळला सहा विकेट राखून हरवले. 

प्रथम फलंदाजी करताना केरळने २० षटकांत सात बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईचे सलामीचे दोन्ही फलंदाज झटपट तंबूत परतल्याने मुंबईच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कर्णधार आदित्य तरेने केलेल्या ७१ धावांच्या जबरदस्त खेळीमुळे मुंबईला विजय साकारता आला. 

तरेला साथ दिली ती सिद्धेश लाड (३६) आणि अभिषेक नायर (नाबाद ३८) यांनी. यांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने १६४ धावा करत विजय मिळवला.