टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात

कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली. 

Updated: Aug 24, 2015, 04:34 PM IST
टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात title=

कोलंबो: कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली. 

भारताचा श्रीलंकेमधील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरलाय. तर विराट कोहलीच्या कॅप्टन्सीखालीही टीम इंडियानं पहिला विजय साकारला. अश्विननं सेकंड इनिंगमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या स्पिन बॉलिंगमुळेच भारताला दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवता आला. 

तर अजिंक्य रहाणेची 126 रन्सची इनिंगही भारताच्या विजयात निर्णायक ठरली. दरम्यान, लंकन बॅट्समन कुमार संगकाराची ही अखेरची टेस्ट ठरली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.