कोकणच्या चाकरमान्यांना `मरे` पावली!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 29, 2013, 11:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.
येत्या 31 जुलैपासून जादा गाड्यांसाठीचं आरक्षण सुरू होणार आहे. यापैकी 64 गाड्या कुर्ला टर्मिनसवरून, 42 गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून तर 16 गाड्या दादरहून धावणार आहेत. दादर-सावंतवाडीदरम्यान दररोज अनारक्षित ट्रेन जाणार आहे.
या काळात प्रत्येक गुरूवारी कुर्ला टर्मिनस ते मडगाव अशी खास फुल्ल एसी ट्रेनही धावणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.