Chanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ

Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.

Updated: Nov 5, 2022, 12:40 PM IST
Chanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ title=

Acharya Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या धोरणात दैनंदिन जीवनाशी निगडीत अशी रहस्ये सांगितली आहेत जी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत.  (Acharya Chanakya Niti) आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी होते. चाणक्य नीती  (chanakya niti) नीट वाचून नंतर ती आपल्या जीवनात लागू करणारे स्त्री-पुरुष नेहमी यशस्वी होतात आणि प्रत्येक संकटातून वाचतात. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की, काही काम कधीही करु नये. हा नियम स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतो. तसे न केल्याने कुटुंबाचा नाश होतो आणि गरिबी येते.

अशा लोकांना त्रास देऊ नका !

आचार्य चाणक्य म्हणतात की, गर्विष्ठ होऊन दुबळ्या लोकांचा कधीही अनादर करु नका, नीतीशास्त्रात सांगितले आहे की, ज्या लोकांची प्रतिष्ठा चांगली आहे. त्यांनी स्वतःहून दुबळ्या लोकांना कधीही त्रास देऊ नये. असे केल्यावर घरातून माता लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे घरात राहत नाही आणि गरिबी घरातच नांदते. (अधिक वाचा -  सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या)

घरात महिलांचा सन्मान झाला पाहिजे

घरातील महिलांचा आदर करणे आवश्यक आहे. जिथे स्त्रीचा आदर केला जात नाही तिथे लक्ष्मी दूर जाते आणि कुटुंब अनाथ बनते. घरातील म्हातार्‍या स्त्रियांचा अनादर केल्याने स्त्रीही घोर पापाचा भाग बनून जीवनात मरणासमान दु:ख भोगते. दुसरीकडे, जर एखाद्या पुरुषाने असे केले तर त्याला देखील स्त्रीप्रमाणेच वेदना सहन कराव्या लागतात.

कठोर परिश्रम करणाऱ्यांचा आदर करा

नीतिशास्त्रात असे सांगितले आहे की, जो कोणी कष्टकरी लोकांचा अनादर करतो, तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अशा लोकांनी काही काळ यशाची चव चाखली तरी ही उंची फार काळ टिकत नाही. अशी माणसे जमिनीवरून जमिनीवर यायला वेळ लागत नाही.