टी-20 क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला.

Updated: Dec 24, 2017, 11:39 PM IST
टी-20 क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ही सीरिज ३-०नं खिशात घातली. या विजयामुळे भारताच्या टी-20 क्रमवारीमध्येही फायदा झाला आहे. १२० पॉईंट्ससह टी-20मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयसीसीच्या टी-20 क्रमवारीमध्ये १२४ पॉईंट्ससह पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडच्या खात्यातही १२० पॉईंट्सच आहेत.

२०१७ या वर्षामधली भारत शेवटची मॅच खेळला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारत १२४ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर वनडेमध्ये ११९ पॉईंट्ससह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.