ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंधानाने चौकार-षटकार मारत साजरे केले अर्धशतक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यांत जरी भारताचा पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या अर्धशतकाची चर्चा जोरदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना तिने समर्थपणे तोंड देत १६३.४१च्या सरासरीने ४१ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. यात मंधानाने ११ चौकार आणि २ षटकार लगावले. याचाच अर्थ तिने ५६ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या. 

Updated: Mar 22, 2018, 01:47 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंधानाने चौकार-षटकार मारत साजरे केले अर्धशतक title=

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यांत जरी भारताचा पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या अर्धशतकाची चर्चा जोरदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना तिने समर्थपणे तोंड देत १६३.४१च्या सरासरीने ४१ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. यात मंधानाने ११ चौकार आणि २ षटकार लगावले. याचाच अर्थ तिने ५६ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या. 

मंधानाच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहा विकेट राखत पूर्ण केले. 

ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या. 

मिताली राज हिने १८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यात १३ धावा करता आल्या. वेदा कृष्णामूर्ती १५ धावांवर नाबाद राहिली. 

ऑस्ट्रेलियाचा विजय

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचे आव्हान १८.१ षटकांत चार विकेट राखत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथनी मूनीने ४५ धावा करत विजयाचा पाया रचला. तर एल्सी विलनीने २९ धावा केल्या. 

तिरंगी मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियासह इंग्लंडचा समावेश आहे. उद्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-२० रंगणार आहे.