ऊस आंदोलन

पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाची ठिणगी

ऊस वाहतूक करणारे ट्रक अडवले.

Nov 15, 2019, 08:11 AM IST

राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jan 16, 2015, 05:46 PM IST

साखर आयुक्त पैसे गोळा करण्यात दंग - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.

Jan 13, 2015, 02:23 PM IST

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

Nov 28, 2013, 11:24 AM IST

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

Nov 8, 2013, 10:49 PM IST

ऊसाला २५०० रूपये भाव

सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

Nov 19, 2012, 03:36 PM IST

ऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद

ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

Nov 14, 2012, 05:45 PM IST

पेटवा पेटवी

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

Nov 14, 2012, 05:33 PM IST