upa

हेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा

नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.

May 4, 2014, 07:11 PM IST

`मौन` पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर टीका काही थांबेना!

राजकीय विरोधकांनंतर आता यूपीए सरकारला पुस्तकांनी घेरलंय. पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर आता  माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान आणि यूपीए सरकारचे वाभाडे काढले आहेत.

Apr 15, 2014, 11:11 AM IST

रणसंग्राम २०१४ - पक्षांची सद्यस्थिती

लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे, सोळाव्या लोकसभेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Apr 4, 2014, 10:07 PM IST

विषाची शेती करणाऱ्यांना सत्ता देऊ नका - सोनिया

विषाची शेती करणाऱ्या आणि विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलंय. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यात झालेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांनी मोदींवर आणि भाजपवर कडाडून टीका केली.

Feb 1, 2014, 11:05 PM IST

ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.

Jan 29, 2014, 11:12 AM IST

मला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग

आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.

Jan 3, 2014, 11:50 AM IST

राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य या संदर्भात थोड्याच वेळात राहुल गांधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Oct 2, 2013, 10:32 AM IST

पंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!

अमेरिकेच्या दौ-यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे मी विचलित होत नाही, असं पंतप्रधान म्हणाले.

Oct 1, 2013, 11:11 PM IST

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

Sep 24, 2013, 07:47 PM IST

सध्याच्या परिस्थितीतून भाजपच देश वाचवू शकतो- मोदी

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागलीय. देशातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४मध्ये नागरिकांनी पुढं येऊन परिवर्तन होण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मोदींना आज परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Sep 22, 2013, 10:26 AM IST

लोकसभेत जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक मंजूर

लोकसभेत मंजुरीसाठी ठेवलेल्या `जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक २०११` ला मंजुरी मिळाली आहे. अन्न सुरक्षा विधेयकानंतर यूपीए सरकारचं आणखी एक महत्वाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.

Aug 30, 2013, 09:01 AM IST

पोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!

लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.

Aug 27, 2013, 08:21 PM IST

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर

युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.

Aug 26, 2013, 11:16 PM IST

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

Aug 26, 2013, 08:39 PM IST

८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

Aug 6, 2013, 09:13 AM IST