water supply

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.

Apr 17, 2013, 08:00 PM IST

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 10, 2013, 01:25 PM IST

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

Mar 6, 2013, 08:08 PM IST

पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`

नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.

Oct 29, 2012, 08:08 AM IST

जलसंपदा विभागात २० हजार कोटींची `गोलमाल`

जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.

Sep 23, 2012, 01:49 PM IST

अजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध

खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.

Jul 15, 2012, 12:48 PM IST

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार!

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे

May 18, 2012, 08:41 AM IST

शेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

May 18, 2012, 08:37 AM IST

इंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई

राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

Apr 22, 2012, 07:53 PM IST

नाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण

नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

Mar 31, 2012, 05:46 PM IST

राज्यात पाणी टंचाई, खासगी टँकर खाणार मलई!

फेब्रुवारी महिन्यातच राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचं संकट ओढवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल सात जिल्ह्यांत टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी खूपच लवकर ओढवलंय.

Mar 1, 2012, 05:05 PM IST

पुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणार आहे.

Feb 29, 2012, 05:58 PM IST

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

Feb 24, 2012, 06:53 PM IST

उंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या

दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.

Dec 3, 2011, 03:13 PM IST

मुंबईत ५० % पाणी कपात

मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.

Nov 17, 2011, 07:34 AM IST