'दिल चाहता है'च्या सिक्वलबाबत अक्षयचा खुलासा

दिल चाहता है...

Updated: Aug 14, 2019, 09:16 PM IST
'दिल चाहता है'च्या सिक्वलबाबत अक्षयचा खुलासा title=

मुंबई : आकाश, समीर आणि सिद्धार्थची दोस्ती दाखवलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाला काही दिवसांपूर्वीच १८ वर्ष पूर्ण झाली. यावेळी चाहत्यांकडून चित्रपटाच्या सिक्वलचीही मागणी होत होती. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आमिर, अक्षय आणि सैफ या तिघांच्या मैत्रीला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.  

बॉलिवूडमधल्या यारी दोस्तींच्या चित्रपटांमधला 'दिल चाहता है' माईलस्टोन ठरला. आजही 'दिल चाहता है' चाहत्यांच्या मनात कायम आहे. चित्रपटाच्या सिक्वलबाबत नेहमीच चर्चा होत असते. पण आता चित्रपटाच्या सिक्वलबाबत अक्षय खन्नानेच खुलासा केला आहे.

अक्षय त्याच्या आगामी 'सेक्शन ३७५'च्या ट्रेलर लॉन्चवेळी मीडियाशी बोलत होता. त्यावेळी त्याने, 'मी फरहानला 'दिल चाहता है'चा सिक्वल बनवण्यासाठी त्याने आमच्या तिघांचीही वयाची ५० वर्ष पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी. त्यानंतरच त्याने 'दिल चाहता है २' बनवण्याचा विचार करावा' असं म्हटलं.

आमीर ५० वर्षांचा झाला, सैफही काही वर्षात ५० वर्षांचा होईल आणि मी ४४ वर्षांचा असल्याने मला ५० वर्ष होण्यासाठी आणखी काही वर्ष असल्याचं अक्षयने सांगितलं.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल चाहता है'चं फरहान अख्तरने दिग्दर्शन केलं होतं. त्यालाही चित्रपटाच्या सिक्वलविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने, हा चित्रपट त्या विशिष्ट वेळ आणि परिस्थितीवर बनवण्यात आला होता. पण आता पुन्हा असं होणं कठीण असल्याचं फरहानने म्हटलं होतं. 

त्यामुळे आता खरंच 'दिल चाहता है' प्रेक्षकांच्या भेटीला येणार का?, पुन्हा एकदा त्या तिघांची दोस्ती अनुभवता येईल का? आणि तिघेही पन्नाशीनंतर कसे असतील याची उत्सुकता मात्र नक्कीच असेल.

अक्षय खन्ना आगामी 'सेक्शन ३७०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सेक्शन ३७०' १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.