...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...'

Katrina Kaif threatened Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या आधी कतरिना कैफनं विकीला चक्क लग्न विसरून जा... म्हणत धमकी दिली होती.

दिक्षा पाटील | Updated: Nov 25, 2023, 12:28 PM IST
...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...' title=
(Photo Credit : Social Media)

Katrina Kaif threatened Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेच आतुर होते कारण त्या दोघांना कधीच सोशल मीडियावर किंवा ऑफ कॅमेरा कोणी एकत्र पाहिले नव्हते. मात्र, तुम्हाला माहितीये का की विकीचा कतरिनासोबतचा लग्नापर्यंतचा हा प्रवास देखील सोपा नव्हता. कारण कतरिनानं विकीला लग्न तू विसरूनच जा अशी एकदा धमकी दिली होती. याचा खुलासा विकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. विकीनं सांगितलं की त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या शूटिंग आणि त्यांच्या लग्नाची तारखा या क्लॅश होत होत्या. तर स्वत: च्या लग्नाला जाण्यासाठी विकीला शूटिंगमधून सुट्टी घ्यावी लागली होती.  

विकीनं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्याला त्याच्याच लग्नाची सुट्टी अशी मिळाली जणू काही त्याला स्वत: च्या लग्नासाठी नाही तर दुसऱ्याच्या लग्नाला जायचं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला लग्नाच्या दोन दिवसात सेटवर परतण्यास सांगितले होते. जेव्हा कतरिनाच्या हे लक्षात आलं तेव्हा तिला राग आला होता. कतरिनाला इतका राग आला होता की तिनं विकीला धमकी दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगत विकी म्हणाला, माझ्या लग्नाच्या आधी मी चित्रपटाचं अर्थ शूटिंग संपवलं आणि मग मी फ्लाइट पकडली आणि स्वत: च्या लग्नासाठी गेलो. बरोबर लग्नाच्या दोन दिवसात मला सेटवर बोलावलं होतं. एकीकडे निर्मात्याचा दबाव तर दुसरीकडे कतरिना कैफनं धमकी दिली होती की तुला लग्नाच्या दोन दिवसानंतर सेटवर जायचंय तर लग्न करूच नको. तेव्हा मी तिला नाही म्हटलं आणि मी पाच दिवसांनंतर सेटवर गेलो. 

कतरिनाशी लग्न केल्यानंतर आयुष्यात असे झाले बदल

विकीनं हे देखील सांगितलं की कतरिनाशी लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले. विकी म्हणाला, लग्न हे खूप सुंदर आहे आणि आपल्यासाठी एक योग साथीदार शोधणं हा खरंच एक आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही घरी परतला आहात. खूप शांती आहे. ही खूप चांगली भावना असते की तुमच्या आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती आहे. त्याच्यासोबत राहणं आणि आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं खूप मजेशीर आहे. मी तिच्यासोबत खूप फिरतो. त्यात असं काही आहे जे या आधी मी कधीच अनुभवलं नाही. 

एकाच इंडस्ट्रीमध्ये असून कामावर कधीच बोलत नाहीत!

विकीनं सांगितलं की कतरिना कामाचं कधीच बोलत नाही. आम्ही कामाविषयी जास्त चर्चा करत नाही. आम्ही दोघं एकाच इंडस्ट्रीमध्ये आहोत त्यामुळे आम्ही त्याविषयी बोलतो. पण आम्ही स्क्रिप्ट किंवा इतर गोष्टींविषयी बोलत नाही.

हेही वाचा : साडी नेसून व्हिडीओ पोस्ट केला अन्.., Instagram वरील ट्रोलिंगला कंटाळून दहावीतील मुलाची आत्महत्या

दरम्यान, विकीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'सॅम बहादुर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारनं केलं आहे. तर हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित करणार आहे. त्याच दिवशी रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर कतरिना कैफचा 'टायगर 3' हा दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला.