Akshay Kumar वर रवीना टंडनकडून फसवणूकीचा आरोप; खुलासा करत म्हणाली, 'एक नाही तर तीन...'

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Updated: Feb 1, 2022, 03:31 PM IST
Akshay Kumar वर रवीना टंडनकडून फसवणूकीचा आरोप; खुलासा करत म्हणाली, 'एक नाही तर तीन...' title=

मुंबई : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी जोरात होत्या. मात्र, दोघांनीही ते उघडपणे स्वीकारले नाही. पण काही जुन्या मुलाखती आहेत, ज्यात ते त्यांच्या नात्याबद्दल बोलले होते. त्यावेळी अक्षय आणि रवीनाच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. पण नंतर ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची मनं मोडली. विभक्त झाल्यानंतर अक्षयने एका मुलाखतीत रवीनाशी एंगेजमेंट केल्याचे कबूल केले. परंतु त्यांचे लग्न ढाले नाही. अक्षय कुमारने ट्वींकल खन्नासोबत लग्न केलं, त्यानंतर हे जोडपं सुखी आयुष्य जगत आहेत.

एका मुलाखतीत रवीनाने सांगितले होते की, अक्षयने एकावेळी 3-3 मुलींना डेट केले होते. त्याने रवीनाशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. ब्रेकअप झाल्यानंतरही रवीनासोबत आपले चांगले संबंध असल्याचेही अक्षयने मान्य केले.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचा 'मोहरा' हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढत गेली.

रवीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना शिल्पा शेट्टीला डेट करत होता. अक्षयने आपली फसवणूक केल्याचे रवीनाने म्हटले होते. म्हणून तिच्या मैत्रिणींनी आधीच तिला अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले होते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रवीना अक्षयवर इतकी चिडली होती की तिने मीडियामध्ये अक्षयबद्दल असेही म्हटले होते की, 'खिलाडी कुमार'ला 'प्रत्येक सुंदर मुलीला' प्रपोज करण्याची सवय आहे. तो मुंबईतील 75% मुलींच्या पालकांना तो मम्मी-पप्पा बोलवतो.'

एवढेच नाही तर एका फॅशन मॅगझिनला मुलाखत देताना रवीना म्हणाली होती की, 'अक्षयकडे सर्व काही आहे, फक्त निष्ठा आणि प्रामाणिकपणा नाही.'