आता पर्यंत लग्न का नाही केलं? ट्रोलरच्या प्रश्नावर अनन्या म्हणाली...

चाहत्यांच्या प्रश्नावर काय म्हणाली अनन्या पांडे?

Updated: Aug 19, 2021, 11:19 AM IST
आता पर्यंत लग्न का नाही केलं? ट्रोलरच्या प्रश्नावर अनन्या म्हणाली... title=

मुंबई : अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (arbaaz khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसचं आहे, अभिनेत्याचा सेलेब्रिटी चॅट शो पिंच (Pinch)चा दुसरा भाग सध्या तुफान चर्चे आहे. पिंच (Pinch) शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल उघड चर्चा करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर देताना दिसतात. अरबाजच्या प्रश्न-उत्तरांच्या या खेळात अभिनेत्री अनन्या पांडेने हजेरी लावली आहे. शोमध्ये अनन्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

अनन्याने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपल स्थान पक्क केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ट्रोलर्सची संख्या देखील फार मोठी असते. अरबाजच्या  शोमध्ये अनन्याने  चाहत्यांची आणि ट्रोलच्या प्रश्नांना उत्तर दिली आहे. एकाने अनन्याला विचारलं की तु लग्न का नाही करत?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नावर अनन्या म्हणाली, 'हा प्रश्न मला वयाच्या 30व्या वर्षी विचारा आता नाही...' त्यामुळे अरबाजच्या शोमध्ये उघड झालं की अनन्या अद्याप लग्नाच्या विचारात नाही.  अनन्याबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या अभिनेता इशान खट्टरला डेट करत आहे. 'खाली पीली' चित्रपटात त्यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. 

अनन्या्च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने अभिनेत्री तारा सुतारिया अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासोबत  'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'  चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता अनन्या  तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे.