'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...

दिक्षा पाटील | Updated: Sep 1, 2024, 10:06 AM IST
'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र, अभिषेकनं पुढे येऊन ही अफवा असल्याचं सांगितलं. मात्र, या आधी दोघांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हे मान्य केलं की त्या दोघांचे लग्नाच्या सुरुवातीला सतत भांडणं व्हायची. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघं 'उमराव जान' या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी जवळ आले. काही काळ एकत्र राहिल्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांनी मुलाखतीत हा खुलासा केला होता की ते दोघं रोज भांडायचे. 

अभिषेक आणि ऐश्वर्यानं वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की रोज त्यांच्यात भांडणं व्हायची. मात्र, अभिषेकनं हे स्पष्ट केलं होतं की त्यांच्यात काही मोठी भांडणं होत नव्हती. फक्त ते त्यांची मतं मांडतात असं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्याला 2010 मध्ये 'वोग इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत विचारलं की त्यांच्यात किती भांडणं होतात? त्यावर ऐश्वर्यानं हे मान्य केलं होतं की ते रोज भांडतात. मात्र, अभिषेकनं तेव्हा स्पष्ट करत सांगितलं होतं की 'ते फक्त आमची मतं मांडण्यासारखी होते. त्यात कोणतंही भांडणं नव्हतं. त्यात गंभीर असं काही नव्हतं, तर हेल्दी भांडणं होती. पण असं झालं नसतं तर त्या नात्यात मज्जा राहिली नसती.'

न्यूज18 इंग्लिशच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायशी एका पत्रकारानं एका वेगळ्या मुलाखतीत विचारलं की अभिषेकनं एका मुलाखतीत सांगितलं की 'तुम्ही नवविहात असून एक जुनं जोडपं आहोत. याचा अर्थ काय आहे? ऐश्वर्यानं त्यावर उत्तर देत सांगितलं की आम्ही एकमेकांना अगदी सहजपणे समजतो. मला वाटतं की 'नुकतंच लग्न झालेलं' याचा अर्थ असा असेल की आमच्यात जे नातं आहे ते खूप सुंदर आहे कारण हे मैत्रीवर अवलंबून आहे. 

ऐश्वर्याला पुढे विचारण्यात आलं की अभिषेकनं असं देखील सांगितलं की तुम्ही दोघं रोज भांडता, तर यात किती सत्य आहे? ऐश्वर्यानं सांगितलं की 'माझा हाच अर्थ आहे की जेव्हा मी बोलते की आम्ही 10 वर्षांपासूनसोबत आहोत. तर आम्ही लग्नाच्या आधीपासून एकदी तसेच आहोत.' 

हेही वाचा : हाच 'तो' चित्रपट ज्यानं राजेश खन्ना यांचं करिअर संपवलं!

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक काही दिवसांपूर्वी जेव्हा विभक्त होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा त्या दोघांचे चाहते हे त्या दोघांमध्ये सगळं काही ठीक व्हावं अशी आशा करत होते.  मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा ते अनंत आणि राधिकाच्या लग्नात वेगवेगळे आल्याचे पाहिले तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर अभिषेकनं समोर येऊन या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं.