विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तिघांचा मृत्यू....

गुजरातमधील एका विहिरीतील विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे दोन भावांसह एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 11, 2017, 12:39 PM IST
विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तिघांचा मृत्यू.... title=

राजकोट : गुजरातमधील एका विहिरीतील विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे दोन भावांसह एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोरबी जिल्हातील मालिया शहरात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे रामजी ठाकूर (२७), त्याचा लहान भाऊ अनिल (२१) आणि एक कामगार वाघजी खमभडिया यांचा मृत्यू झाला आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळ गेलेले तिघे बेशुद्ध झाले. त्यानंतर तिघांनाही बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले."
मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.