लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट

Ajab Gajab : घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती आंघोळ करत नसल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे. लग्नाला चाळीस दिवस झाले असून या दिवसात पतीने केवळ सहा दिवस आंघोळ केली. यामुळे आजार होण्याची भीती महिलेने व्यक्त केली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 17, 2024, 09:38 PM IST
लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट title=
प्रातिनिधिक फोटो

Ajab Gajab : उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणीने लग्नाच्या अवघ्या 40 दिवसांनंतर पतीकडे घटस्फोट मागितला आहे. पती आठवड्यातून फक्त एकदा आंघोळ (Bathed) करत असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. बाकिच्या दिवशी अंगावर गंगाजल शिंपडून पूजा पाठ करत असल्याचं या तरुणीने म्हटलं आहे. पतीच्या या वाईट सवयीमुळे कंटाळलेल्या पत्नीने स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून घटस्फोटाचीही मागणी केली आहे.

पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक कोर्टाकडे हस्तांतर केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 दिवसांपूर्वी तरुणीचं लग्न झालं. पती कथा वाचक आणि पूजा पाठ करण्याचं काम करतो. लग्नानंतर तरुणी सासरी पोहचली काही दिवस तीने या प्रकराकडे दुर्लक्ष केलं. पण दिवस जसजसे पुढे जात होते, तसं महिलेला हा सर्व प्रकार विचित्र वाटू लागला. पती आंघोळ करत नसल्याने एक दिवस पत्नीने याबाबत त्याला विचारलं, पण त्याने पत्नीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर अंगावर गंगाजल टाकून तो पूजा करण्यास बसला.

याशिवाय पत्नी करत असेल्या व्रत वैकल्यानांही पतीने विरोध केला. पत्नी सोमवारचं व्रत ठेवत होती. पण याला पतीने विरोध करायाल सुरुवात केली. आपल्या वडिलांचं सोमवारी निधन झाल्याने या दिवशी व्रत करु नकोस असं सांगत तिला व्रत ठेवण्यास विरोध केला.

आजार होण्याची भीती

व्रत ठेवण्याला विरोध असल्याने पत्नीने पतीचं म्हणणं ऐकलं. पण पती आंघोळ करत नसल्याबद्दल तीने अनेकवेळा त्याला सुनावलं. लग्नानंतरच्या चाळीस दिवसात पतीने केवळ सहा वेळा आंघोळ केली. पती आंघोळ करत नसल्याने आजार होण्याची भीती पत्नीला सतावू लागली. अखेर पत्नी आपल्या माहेरी निघून गेली.

हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेल्यानंतर दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं. पण पतीने पत्नी खोटं बोलत असल्याचं सांगितलं. तर पत्नीने पती खोटं बोलत असल्याचा आरोप केला. आंघोळ करण्यास सांगितल्यावर मारहाण करत असल्याची तक्रारही पत्नीन केलीय. आठवड्यातल्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पती आंघोळ करतो, बाकीच्या दिवशी अंगावर गंगाजल शिंपडत असल्याचं पत्नीने सांगितलं. समुपदेशानंतर पतीने पत्नीला रोज आंघोळ करण्याचं वचन दिलं आहे.