रस्ते अपघातात जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना मोदी सरकारकडून प्रोत्साहन; 5000 रुपयांचे बक्षिस मिळणार

आता रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याऱ्यांना केंद्र सरकारकडून रोख बक्षिस मिळणार आहे. 

Updated: Oct 5, 2021, 12:52 PM IST
रस्ते अपघातात जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना मोदी सरकारकडून प्रोत्साहन; 5000 रुपयांचे बक्षिस मिळणार  title=

नवी दिल्ली : आता रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याऱ्यांना केंद्र सरकारकडून रोख बक्षिस मिळणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रस्ते दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तींसाठी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतात ही योजना लागू केली जाणार आहे. भारतीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याबाबत सूचित केले आहे.  ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे.

सचिवांसाठी जारी दिशा-निर्देश
मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, अपघातात मदत करणाऱ्याला पुरस्कार योजनेची सुरूवात केली जात आहे. यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी धावणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि रुग्णाला त्वरीत उपचार मिळू शकतील.